रविवार, सोमवार तसेच मंगळवारी असे तीन दिवस बिबट्याचे दर्शन होत असून एक नव्हे तर तीन बिबटे असल्याचा अंदाज गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. बिबटे दिवसेंदिवस गावात व मळ्यातील कुत्रे बिबट्या फस्त करत आहेत. आतापर्यंत जवळपास तीन कुत्र्यांचा मृत्यू या हल्ल्यात झाला आहे. वनविभाग आणि पशु वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. मुखेड गावात बिबट्याचा वावर वाढला असल्याने पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचा घटना वाढत आहेत. त्यामुळे वन विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एकापेक्षा अधिक पिंजरे लावावे अशी मागणी सरपंच अमोल जाधव यांनी केली आहे.