तलाठी मार्फत करण्यात येत असलेली पिकांची नोंद शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने, शासनाने मोबाईल ॲप मार्फत पिक नोंदणी सुरु केली आहे. शेतकरी वर्गाकडून या ई-पिक नोंदणीस उदासिनता दिसून येत आहे. ई-पिक पाहणी संदर्भात, महसुल विभागामार्फत वारंवार जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वत: शेतात जाऊन करायची असून, असे न केल्यास शेतकऱ्यांचा पिकपेरा कोरा राहू शकतो. त्यामुळे शासकीय मदत, अनुदान, पिक कर्जास शेतकऱ्यांना विविध आडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर ई-पिक नाेंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.