Jalgaon news: जळगावात कोट्यवधींचा बायपास पहिल्याच पावसात खचला; NHAI अन् ठेकेदाराचे पितळ उघडे

तरसोद-पाळधी महामार्गावरील पुलाचे पिलर कोसळले, रस्त्याला मोठे तडे; सुदैवाने जीवितहानी टळली, एनएचएआय अधिकाऱ्यांची फोन उचलण्यास चालढकल
Jalgaon news: जळगावात कोट्यवधींचा बायपास पहिल्याच पावसात खचला; NHAI अन् ठेकेदाराचे पितळ उघडे
Published on
Updated on

जळगाव : शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि प्राणघातक अपघात टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बहुचर्चित तरसोद ते पाळधी बायपास महामार्गाचा दर्जा पहिल्याच जोरदार पावसात वेशीवर टांगला गेला आहे. वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आलेल्या या दोन पदरी बायपासवरील पुलाचे पिलर ढासळले असून रस्त्याला भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे हा भीषण प्रकार घडला असून ऐन वाहतुकीच्या वेळी पूल खचला नसल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.

Jalgaon news: जळगावात कोट्यवधींचा बायपास पहिल्याच पावसात खचला; NHAI अन् ठेकेदाराचे पितळ उघडे
Jalgaon News | जिल्हाधिकारी यांचा 'शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी' उपक्रमात सहभाग

एनएचएआय अन् ठेकेदाराचा 'नाकर्तेपणा' उघड

मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणाऱ्या या बायपास रस्त्याचे बांधकाम 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने' (NHAI) ठेकेदाराकडून करून घेतले होते. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात पुलाच्या पिलरचे बांधकाम कोसळून पिलर थेट उघडे पडल्याने ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. साळुंखे व संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, एकाही जबाबदार अधिकाऱ्याने फोन उचलण्याचे सौजन्य दाखवले नाही. अधिकारी फोन उचलण्यास टाळाटाळ करत असल्याने प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Jalgaon news: जळगावात कोट्यवधींचा बायपास पहिल्याच पावसात खचला; NHAI अन् ठेकेदाराचे पितळ उघडे
Aditi Tatkare Jalgaon news : ‘लाडकी बहीण’ बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे आज पुळका दाखवत आहेत; तटकरेंचा विरोधकांवर थेट हल्ला

वाहतूक पूर्णपणे ठप्प; पाळधीजवळ रस्ता केला बंद

पुलाचा भाग खचल्यामुळे अवजड वाहनांच्या पेल्याने संपूर्ण पूल कोसळण्याचा थेट धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तरसोद ते पाळधी या बायपास महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे.

  • उपाययोजना: पाळधी गावाजवळ बायपासच्या सुरुवातीलाच प्रशासनाने फलक लावून तसेच खडी टाकून रस्ता रोखला आहे.

  • पर्यायी मार्ग: बायपास बंद केल्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक पुन्हा एकदा जळगाव शहराच्या मुख्य रस्त्यावरून वळवण्यात आली आहे.

  • आणीबाणी सज्जता: अपघात किंवा अनुचित प्रकार घडल्यास मदतीसाठी घटनास्थळी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे.

Jalgaon news: जळगावात कोट्यवधींचा बायपास पहिल्याच पावसात खचला; NHAI अन् ठेकेदाराचे पितळ उघडे
Jalgaon Theft News | जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; भडगाव, भुसावळात लाखोंचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

'त्या' ठेकेदारावर कारवाई होणार की राजकीय अभय मिळणार?

अवघ्या वर्षभरापूर्वी लोकांसाठी खुला करण्यात आलेला हा रस्ता इतक्या लवकर कसा खचला? यामागे ठेकेदाराने केलेला भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांचे असलेले मेहेरबान हात कारणीभूत असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत.

संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष

ज्या वेळी पुलाचे बांधकाम खचले, सुदैवाने त्या वेळी रस्त्यावर मोठी रहदारी नव्हती; अन्यथा शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता. आता या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला आणि डोळे मिटून बिल मंजूर करणाऱ्या एनएचएआयच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, की नेहमीप्रमाणे त्यांना 'राजकीय क्षय' (अभय) देऊन प्रकरण दाबले जाणार? याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news