Ajit Pawar : शेतमाल रस्त्यावर फेकल्याने भाव वाढणार नाही : अजित पवारांनी सुनावलं
नाशिक : पुढारी ऑनलाइऩ डेस्क
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमध्ये आले असता वणी येथे शेतक-यांनी त्यांच्या ताफ्यासमोर कांदा व टोमॅटो रस्त्यावर फेकून निषेध नोंदवला. शेतक-यांच्या या कृतीवर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कांदा व टोमॅटो रस्त्यावर फेकल्याने भाव वाढणार नाही असे अजित पवार यांनी सुनावले आहे.
अजित पवार हे कळवण येथे शेतकरी कृतज्ञता मेळाव्यात बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले, एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की सर्व शेतकरी त्याच पिकाची लागवड करतात. परिणामी पिकाचा पुरवठा वाढला की भाव घसरतात. शेतमाल रस्त्यावर फेकल्याने घसरलेले भाव वाढणार नाहीत असे अजित पवार म्हणाले. तसेच सरकार तुमच्यासोबत आहे, शेतक-यांना आम्ही वा-यावर सोडणार नाही असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले.
हेही वाचा :