धुळे : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचा नवस फेडण्यासाठी जाणार्या दाम्पत्याला जमावाने बेदम मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील टेकवाडे गावात घडली. या संदर्भात सहा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेकवाडे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये पारधी समाजातील उमेदवाराचा विजय झाला. त्यामुळे या गावातील ज्योती कांतिलाल पारधी, कांतिलाल पारधी आणि अन्य समाज बांधव टेकवडे गावातील देवमढी येथे नवस फेडण्यासाठी जात होते. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा वाद उकरून काढत त्यांना बेदम मारहाण करीत पूजेच्या साहित्याचे नुकसान करण्यात आले.