नाशिक : …तर औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करु, स्वामी अनिकेतशास्त्रींचा इशारा

नाशिक : …तर औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करु, स्वामी अनिकेतशास्त्रींचा इशारा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यासाठी प्राणाहुती दिलेल्या प्रत्येक मावळ्याचा घोर अपमान करणाऱ्या अकबरूद्दीन ओवेसीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाशिकमधील महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.

लवकरात लवकर अकबरूद्दीन ओवेसीवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा औरंगजेबाच्या कबरीवर सर्व संत समाज व हिन्दुत्ववादी संघटना तसेच छत्रपती प्रेमींच्यावतीने 'कबर उध्वस्त' करुन जन आंदोलन छेडण्यात येईल आणि याची जबाबदारी राज्य सरकारवर राहील, असा इशारा अनिकेतशास्त्रींनी निवदेनातून दिला आहे.

ओवेसीने या कृतीतून महाराष्ट्राचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज व ज्यांनी-ज्यांनी स्वराज्य मिळविण्यासाठी प्राणाहुती दिली त्या- त्या प्रत्येक मावळ्याचा घोर अपमान केला आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही, याची सरकारने दखल घ्यावी असे अनिकेतशास्त्री यांनी म्हटले आहे.

पाच दिवस कबर बंद

औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा याआधी मनसेच्या नेत्यांनी दिली होता. त्‍यामुळे कबर परिसरात  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. येथे अप्रिय घटना घडू नये, म्हणून शुक्रवारपासून (दि.१८) पाच दिवस कबर बंद ठेवण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी दौलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्यापासून वादाला सुरूवात झाली. याबाबत मनसेने आंदोलन छेडले होते. त्यातच मनसेच्या नेत्यांनी कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत पुरातत्त्व विभागाच्‍या सूचनेनुसार पोलिस बंदोबस्त तैनात केला असून दि. १८ ते २२ दरम्यान कबर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news