जळगाव : पुढारी वृत्तसेवा : एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात नेहमीच शाब्दिक युद्ध सुरू असते. आता महाजन यांच्यावर टीका करताना, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्यांना राजकारणात कोणी आणले, तिकीट कोणी दिले, त्यांना मोठे कोणी केले. गिरीश महाजन हे आता राष्ट्रीय नेते झाले. मात्र, नाथाभाऊंनी त्यांना घडवले, हे मात्र ते विसरत आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून नाथाभाऊ हा सर्वसामान्य असेल, असा टोला खडसेंनी लगावला आहे.