जळगाव : नवविवाहितेची आत्महत्या, लग्नाला झाले होते फक्त १० दिवस
नवविवाहिता आत्महत्या : जळगाव मधील शिवाजीनगर येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील नावे येथील किरण हिचा विवाह ११ जुलै रोजी सागर निकम यांच्याशी झाला होता. सागर निकम हे जळगाव शहरातील शिवाजी नगर मधील दांडेकर नगरात राहतात.
किरणने आज ( दि. २१ ) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नाच्या अकराव्या दिवशी नवा विवाहितेने गळफास लावून घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
किरणने गळफास लावून घेतला त्यावेळी पती आणि सासरे हे कामावर गेले होते, तर सासुबाई घराबाहेर होत्या. अशी प्रथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवविवाहितेने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हेही वाचले का?
- ‘पेगासस’ ने केली १० पंतप्रधान आणि एका राजाची हेरगिरी
- ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही : मोदी सरकारच्या उत्तरावर विरोधक संतापले
- धक्कादायक! चाकण एमआयडीसी मध्ये स्फोटकांनी एटीएम मशीन फोडले
पाहा व्हिडिओ : हे विठुराया आता शाळा सुरु होऊ दे..