RSS Centenary Lecture Mumbai: संघ शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत ‘नवे क्षितिज’ व्याख्यानमाला

७–८ फेब्रुवारीला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रतिष्ठित व्यक्तींशी साधणार संवाद
RSS chief Dr. Mohan Bhagwat
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : ‘नवे क्षितिज’ नावाची दोन-दिवसीय व्याख्यानमाला नेहरू सायन्स सेंटर, वरळी येथे ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली आहे. ही व्याख्यानमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त असणार आहे. या शताब्दी वर्षात या आधी दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता इथे अशाच व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या होत्या. मुंबईत होणारी व्याख्यानमाला ही या मालिकेतील शेवटची व्याख्यानमाला आहे.

RSS chief Dr. Mohan Bhagwat
Navi Mumbai Redevelopment: नवी मुंबईत रखडलेला पुनर्विकास मार्गी; किमान 400 चौ. फुटांचे घर मिळणार

या दोन दिवसांत एकूण चार सत्रे होतील. पहिल्या दिवशी दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत दोन सत्रे होतील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या कालावधीत दोन सत्रे होतील. परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे व्याख्यान पहिल्या दिवशी होईल व दुसऱ्या दिवशी त्यांचा सोबत प्रश्नोत्तरांचे सत्र होईल.

RSS chief Dr. Mohan Bhagwat
Bank Employees Strike: पाच दिवसांचा आठवडा लागू करा; बँक कर्मचाऱ्यांचा मंगळवारी देशव्यापी संप

कोकण प्रांताचे संघचालक श्री अर्जुन चांदेकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले, 'विविध क्षेत्रांतील आमंत्रित केलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे, साहित्यिक, वैज्ञानिक, वैद्यकीय व्यावसायिक, वकील, सामाजिक संस्था संचालक, शिक्षणतज्ज्ञ, विविध क्षेत्रातील कलाकार, खेळ क्षेत्राशी संबंधित लोक, मीडिया मालक आणि संपादक, धर्मगुरू, आर्थिक तज्ज्ञ, सोशल मीडिया इंफ्लुएंसर, जाहिराती क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वे आणि महावाणिज्यदूत यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून निमंत्रणाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. गेल्या काही वर्षांत संघकार्यात सज्जन शक्तींचा सहभाग अनेकपटींनी वाढला आहे.”

RSS chief Dr. Mohan Bhagwat
Bellasis bridge Mumbai: 130 वर्षांचा ब्रिटिशकालीन बेलासिस पूल नव्याने उभारला; जानेवारी अखेरीस नागरिकांसाठी खुला

संघ शताब्दी वर्षात, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, स्वबोध आणि पर्यावरण संरक्षण या पंच परिवर्तनावर विशेष भर देण्यात आला आहे.

२०२५ च्या विजयादशमीपासून चालू झालेले शताब्दी वर्ष २०२६ च्या विजयादशमीपर्यंत असणार आहे. हे वर्ष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्राप्रती समर्पित सेवेच्या शतकाचे प्रतीक आहे. समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी गृह संपर्क, हिंदू संमेलन, प्रबुद्ध गोष्टी संमेलने, सद्भाव बैठक आणि युवा संमेलन यांसह अनेक प्रेरणादायी कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे.

RSS chief Dr. Mohan Bhagwat
Mumbai Air Pollution: मुंबईच्या प्रदूषित हवेत हायकोर्टाची चांगलीच ‘बरसात’; पालिकेच्या उपाययोजनांवर तीव्र नाराजी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news