Rohit Arya Encounter: रोहित आर्यचे पैसे कोणी थकवले... तो मंत्री कोण? पवई एन्काऊंटरला वेगळं वळण

रोहित आर्यच्या एन्काऊंटरवरून काँग्रेस नेते अतूल लोंढे यांनी सरकारवर टीका केली आहे.
Rohit Arya Encounter
Rohit Arya Encounterpudhari photo
Published on
Updated on

Rohit Arya Encounter:

पवई परिसरात ऑडिशनच्या बहाण्याने तब्बल १७ निष्पाप मुलांना ओलीस (Hostage) ठेवल्याची अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी रोहित आर्यचा एन्काऊंटर केला. पोलिसांनी ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केली, ज्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. राज्य शिक्षण मंत्रालयानं रोहित आर्यचे पैसे थकवल्याचा आरोप होत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

Rohit Arya Encounter
Education scam : रोहित आर्यच्या संस्थेने शाळांकडून परस्पर आकारले शुल्क

शासन खोटारडे....

रोहित आर्यच्या एन्काऊंटरवरून काँग्रेस नेते अतूल लोंढे यांनी सरकारवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,'या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर केला असला तरी, या घटनेमागील कारणे आणि आरोपीचे कथित 'व्यवहार' आता चर्चेत आले आहेत. हा व्यक्ती 'दहशतवादी' (Terrorist) नसल्याचे समोर आले असले तरी, त्याने हे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोंढे यांनी आरोपीचे झालेले आर्थिक किंवा इतर व्यवहार आणि त्यासंबंधीची शासकीय कागदपत्रे (Government documents) आता सार्वजनिक झाली असल्याचा दावा केला आहे. या कागदपत्रांच्या आधारावर शासनाने दिलेला खुलासा दिशाभूल करणारा, चुकीचा आणि खोटारडा असल्याचा आरोप त्यांनी केला. 'शासन तसे खोटारडेच आहे', अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

'तो' मंत्री कोण? चौकशीची मागणी

आरोपीचे हे कृत्य त्याच्यावर झालेल्या आर्थिक थकबाकीमुळे (Pending Payments) असू शकते, असा अंदाज लावला जात आहे. याच संदर्भात, 'कोणत्या व्यवहारामुळे त्यांनी हे पाऊल उचलले' आणि या व्यवहारांमध्ये कोणता मंत्री सामील होता याची सखोल चौकशी (Inquiry) करण्याची मागणी लोंढे यांनी केली.

Rohit Arya Encounter
Who Was Rohit Arya: मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण होता?

हे अपेक्षित नाही...

दुसरीकडं भाजप नेते साटम यांनी, 'कोणाचे पैसे थकले म्हणून त्याने दहा मुलांना ओलीस ठेवून किडनॅप करणे' हे अपेक्षित नाही आणि असा गुन्हा करणाऱ्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया दिली.

पोलिसांनी केलेल्या एनकाउंटरची (Encounter) मॅजिस्ट्रेट चौकशी (Magistrate Inquiry) होईल, पण त्यासोबतच या आर्थिक- राजकीय व्यवहारांची चौकशी होणे महत्त्वाचे आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, आरोपीचे व्यवहार आणि त्यात सामील असलेल्या मंत्र्याची चौकशी होणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news