

Amit Shah Uniform Civil Code : २०२९ पूर्वी देशात समान नागरी कायदा आणणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि. १३ सप्टेंबर ) मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केली. भाजप सरकारने रक्ताचा एकही थेंब न सांडता कलम ३७० हटवलं आहे. देशात घुसखोरी करणाऱ्यांना शोधून देशाबाहेर काढणार असा स्पष्ट इशारा गृहमंत्री शहा यांनी दिला असून, देशातील माओवादाचा पूर्ण खात्मा करून देशाला माओवादापासून मुक्त केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "आम्ही अनेक राज्यांमध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू केला आहे. मला खात्री आहे की, २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची (NDA) सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये आम्ही समान नागरी कायदा लागू करू. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि 'ऑपरेशन सिंदूर' यांसारख्या मोहिमांमुळे दहशतवादाबाबत 'झिरो टॉलरन्स'चे (मुळीच खपवून न घेण्याचे) धोरण प्रस्थापित झाले आहे, तसेच विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे, असा पुन्नरुच्चारही शहा यांनी केला.
जेन 'झी''च्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे सामाजिक आणि राजकीय परिणामबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "आपण लोकशाहीत आहोत. विविध मुद्द्यांवर लोकांची मते भिन्न असू शकतात आणि ती मते मांडली जाणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, पण आम्ही आणीबाणी लादून राज्यकारभार करू शकत नाही. ती काँग्रेसची संस्कृती आहे, आमची नाही. आमचा संवाद आणि चर्चेवर विश्वास आहे," असेही अमित शहा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजप आणि एनडीए हा देश आणि जनतेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना, १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या काळात सेवा अभियान राबविणार असल्याची माहिती देण्यात आली. भाजप आणि एनडीए ही एकाच ध्येयाने काम करणारी व्यवस्था आहे. देशात घुसखोरी करणाऱ्यांना शोधून देशाबाहेर काढणार असा स्पष्ट इशारा गृहमंत्री शहा यांनी दिला असून, देशातील माओवादाचा पूर्ण खात्मा करून देशाला माओवादापासून मुक्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "मातृभाषेला प्राधान्य देणे हे आमच्या सरकारचे धोरण आहे आणि संविधानानेही यासंदर्भात राज्यांना विशिष्ट निर्देश दिले आहेत. मला वाटत नाही की हा काही मोठा मुद्दा बनेल. काही व्यक्तींनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास क्वचित प्रसंगी काही घटना घडू शकतात, परंतु राज्यांकडे अनुभवी नेतृत्व आहे आणि अशा समस्या सोडवण्याचा मार्ग ते नक्कीच शोधून काढतील."
"गेल्या १२ वर्षांत देशाची जागतिक प्रतिष्ठा लक्षणीयरीत्या उंचावली आहे. कोणताही जागतिक मुद्दा असो, आज भारताच्या पंतप्रधानांच्या मताला विशेष महत्त्व दिले जाते. जगभरातील लोक भारतीय पासपोर्ट बाळगणाऱ्या भारतीय नागरिकाकडे आदराच्या भावनेने पाहतात. नरेंद्र मोदीजींनी भारतीय पासपोर्टचे मूल्य वाढवण्याचे काम केले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे, विविध सर्वेक्षणांमध्ये ६८ टक्के 'अप्रूव्हल रेटिंग' मिळवून ते जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले आहेत. ३६ देशांनी त्यांना त्यांचे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान केले आहेत; हे सन्मान भारताच्या 'भारतरत्न' पुरस्काराच्या तोडीचे आहेत. यावरून भारताची परदेशातील वाढती प्रतिष्ठा दिसून येते," असेही अमित शहा यांनी सांगितले.
"२०१४ पूर्वीचे देशातील राजकारण हे भ्रष्टाचार, जातिवाद आणि घराणेशाहीने ग्रासलेले होते. २०१४ ते २०२६ या राजकीय कालखंडात, देश या समस्यांच्या पलीकडे जाऊन 'कामगिरीवर आधारित राजकारणा'कडे वळला आहे. गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच जनतेने कणखर परराष्ट्र धोरण अनुभवले आहे. आपले संरक्षण धोरण असो वा परराष्ट्र धोरण, 'भारत प्रथम' हेच त्यामागील मार्गदर्शक तत्त्व राहिले आहे. भारताचे हित आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचेही शहा यांनी सांगितले.
'फ्रजाइल फाइव्ह' (Fragile Five - कमकुवत अर्थव्यवस्थांचा गट) मध्ये गणल्या जाणाऱ्या स्थितीपासून आपण जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांच्या श्रेणीत स्थान मिळवण्यापर्यंत मजल मारली आहे. अलीकडील पहिल्या तिमाहीची आकडेवारी दर्शवते की, ७.८% जीडीपी (GDP) विकासदरासह भारत प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय भाषांना योग्य ती मान्यता मिळू लागली आहे. शिवाय, जेव्हा जेव्हा भारतीय सैनिक किंवा नागरिक दहशतवादी कारस्थानांचे किंवा हल्ल्यांचे बळी ठरतात, तेव्हा त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आता एक सक्षम धोरण अस्तित्वात आहे. कलम ३७०, नक्षलवाद आणि ईशान्य भारतातील परिस्थिती यांसारख्या, जवळपास पाच दशकांपासून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या तीन दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करताना आम्ही हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे," असेही अमित शहा यांनी सांगितले.
भाजपआणि आमचे मित्रपक्ष १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प अभियान' राबवत आहेत. या मोहिमेद्वारे, आम्ही या प्रेरणादायी २५ वर्षांच्या प्रवासाची कथा, त्याची उद्दिष्टे, यश आणि भविष्यासाठीचा आमचा संकल्प देशासमोर मांडणार आहोत. सेवेला जीवनशैली बनवणे आणि संघटनेला लोकसहभाग व जनहित साधण्याचे माध्यम बनवणे, हे याचे उद्दिष्ट आहे. यात बारा विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच बूथ, तहसील आणि जिल्हा स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या शेकडो इतर उपक्रमांचा समावेश आहे... तसेच, 'नमो सेवा'च्या अशा क सादर केल्या जातील ज्यामध्ये स्थानिक भाषांमधील संगीत आणि नाट्य सादरीकरणांचा समावेश असेल आणि हे कार्यक्रम देशभरातील गावागावांत पोहोचवले जातील," अशी माहितीही यावेळी अमित शहांनी दिली.