मुंबई : तब्बल १० वर्षांपासून दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना नाहीच
मुंबई पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये दरड कोसळून होणारी जीवित आणि वित्तहानी नवीन नसून मागील 10 वर्षांपासून दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही.
मागील 29 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 300 हून अधिक नागरिक जखमी झाले.
- कोल्हापूर : पंचगंगा नदीत दुर्मीळ ‘अॅलिगेटर गार’ मासा आला कसा?
- बाल लैंगिक अत्याचार : पुण्यात ८ वर्षीय बालकाचा ३ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाण डोंगराळ भागात धोकादायक म्हणून वर्गीकृत आहेत.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, या भागातील 22,483 झोपड्यांपैकी 9657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली.
यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळ्यात भूस्खलनामुळे 327 ठिकाणाबाबत अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला आधीच सतर्क केले होते.
- बोल्डनेसच्या बाबतीत फिटनेस मॉडेल अदिती मिस्त्रीने सनी लिओनीलाही टाकले मागे
- Google Scholar चा उपयोग कसा कराल? ते नेमकं काय आहे?
वर्ष 1992 ते 2021 या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 290 लोकांनी जीव गमावला असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत.
2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणा-या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते.
- HBD Smriti Mandhana ; प्रेमविवाह की अरेंज मॅरेज? प्रश्नावर स्मृती मंधाना म्हणाली..
- अमोल कोल्हे तुम्ही ठाकरेंच्या मेहरबानीमुळेच राजकाणात आलात: शिवसेना
मंडळाच्या अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.
तथापि, त्यानंतर दहा वर्षे उलटून गेली आहेत परंतु नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी करीत आहे, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणतीही अॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलीच नाही, असे गलगली म्हणाले.