Waqf Board land scam : वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळा प्रकरणात ईडीची छापेमारी | पुढारी

Waqf Board land scam : वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळा प्रकरणात ईडीची छापेमारी

पुणे; पुढारी ऑनलाईन

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी आणि भाजप विरोधात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोर्चाच उघडला आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांनी आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्या संदर्भात (Waqf Board land scam) ईडीने आज पुण्यात सात ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना धक्का तर नाही ना? याची चर्चा सुरु झाली आहे.

समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय : नवाब मलिक

समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय. त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

काल गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडले आहे. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर तीन टन ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत २७ हजार कोटी रुपये होती. या ड्रग्जच्या खेळात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनिल पाटील हे किरीटसिंग राणा यांच्याकडे वारंवार का जात आहेत? हे सगळे गुजरातच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कशासाठी रहात आहेत? अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्ज प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. आता द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर एनसीबीची जबाबदारी आहे यातून सत्य बाहेर काढावे. या देशातून अमली पदार्थाचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी १९८५ मध्ये कायदा करण्यात आला होता. त्याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्ज प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. आता द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर एनसीबीची जबाबदारी आहे यातून सत्य बाहेर काढावे. या देशातून अमली पदार्थाचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी १९८५ मध्ये कायदा करण्यात आला होता. त्याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button