नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आमचे सरकार ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, दोन समाज आमने-सामने येतील असे कुठलेही पाऊल उचलणार नाही , कुणी तसा प्रयत्नही करू नये, किंबहुना आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण न होता सर्वंकष असा निर्णय व्हायला हवा, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व नागपुरात सरकार आपल्या दारी कार्यक्रमात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. (Devendra Fadnavis )
मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पण न घेण्याचो टोकाची भूमिका घेतली यासंदर्भात छेडले असता प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनंती केली असल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, या मुद्यावर आज (दि.११) सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन मुंबईत सायंकाळी करण्यात आले आहे. यासंदर्भात भाष्य करताना फडणवीस यांनी सांगितले की, सर्वांनी मिळून एकमताने या प्रश्नावर विचार करण्यासाठी व त्यातून तोडगा काढण्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा