मुंबई; पुढारी वृत्तसेवा : "आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येतीला तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिला यांच्यावरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होईल, अशी भीती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढील संकटाकडे लक्ष वेधले आहे.
"मणिपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवरून आगामी निवडणुकीपूर्वी देशातील संभाव्य संकटाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या 'प्ले बुक' मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे, दंगली आदी अनेक गोष्टी निवडल्या जातील आणि भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल," असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आगामी भारतीय प्रजासत्ताकदिन निवडणुकीतल्या फायद्यासाठी 'भयभीत प्रजासत्ताक' मध्ये रूपांतरित करण्याची भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची योजना आहे, असे सांगतानाच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि 'मोहब्बत की दुकान'चे तुणतुणे वाजवत राहील, असा टोलाही आंबेडकर यांनी काँग्रेसला लगावला आहे.
हेही वाचा :