भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतय : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : भीमा -पाटस साखर कारखाना ५०० कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरण मी सीबीआयकडे पाठवले आहे. या कारखान्यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या तक्रारीकडे डोळेझाक केली आहे, मी सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.
संजय राऊत : विरोधकांवर कारवाई होते पण…
विरोधकांवर कारवाई होते; पण सत्ताधाऱ्यांवर कधीच कारवाई होत नाही. उलट भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळत आहे, असा आरोप करत संजय राऊत म्हणाले, भीमा-पाटस साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या मनी लॉंड्रींग प्रकरणी मी सीबीआयकडे पाठवले आहे. बुधवारी मी भीमा-पाटस परिसरात सभा घेणार आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या गिरणा सहकारी कारखान्यातही भ्रष्टाचार झाला आहे, असेही ते म्हणाले
बारसू-सोलगावमधील सर्वेक्षणाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध असून, आंदोलन सुरू आहे. यावेळी स्थानिक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांच्या गाड्या अडवल्या. पोलिसांनी काहींना अटकही केली. यावर बोलत असताना राऊत म्हणाले, बारसुत सामुदायिक हत्याकांड होवू शकत. अनेकजणांना पोलिस धमकी देत आहेत.
I have filed a formal complaint with the @CBIHeadquarters regarding Bhima Patas Cooperative Sugar Mill’s #MoneyLaundering of 500 crores.
Since Mr @Dev_Fadnavis has turned a blind eye towards my complaint, I have knocked the CBI’s doors. Let’s see what happens next!@dir_ed… pic.twitter.com/NM3y3VbfcG
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 25, 2023
हेही वाचा
- सत्कर्माने कीर्ती मिळत असते : रामदासी, आमदार संग्राम जगताप यांच्याकडून अन्नदान व गोशाळेस आर्थिक मदत
- NCERT चा मोठा निर्णय, अभ्यासक्रमातून’ ‘डार्विन उत्क्रांती सिद्धांत’ मजकूर हटविला; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली नाराजी
- Maruti Suzuki Fronx SUV : मारुती सुझुकीची नवी एसयुव्ही कार भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स