गुंतवणुकीपेक्षा ठाकरेंना त्रास देणं राज्य सरकारला महत्त्वाचं वाटतं : संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Raut
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुंतवणुकीपेक्षा राज्य सरकारला ठाकरे आणि शिवसेनेला त्रास देणं खूप महत्त्वाचं वाटतं, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खासदार संजय राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रेत सहभागी होणं कर्तव्य आहे. बाळासाहेबांचं जम्मू-काश्मीरसोबत भावनिक नातं आहे.

राऊत पुढे म्हणाले- येथील सरकार थोडीदेखील गंभीर नाहीये. शिंदे असो वा फडणवीस असो, सर्वात आधी राजकारण आणि नंतर राज्य असं त्यांचं सूत्र आहे. गुंतवणुकीच्याबाबतीत राज्य खाली घसरत आहे. याबाबत महाराष्ट्राचं सरकार गंभीर नाही. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोदींचा दौरा आहे. राज्य सरकारचं शिवसेनेला त्रास देणं इतकाचं उद्देश आहे. गुंतवणुकीपेक्षा त्यांना ठाकरे आणि शिसेनेला त्रास देणं खूप महत्त्वाचं वाटतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news