रेल्वेच्या चुकीच्या निर्णयाचा फटका, विद्याविहार एक्सलेटरवर ३२ लाखांचा चुराडा
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वे प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका बसला असून विद्याविहार येथील ३२ लाखांचा चुराडा केला आहे. आता ५ वर्षापूर्वी बांधण्यात आलेला एक्सलेट नवीन रेल्वे ओव्हर पुलामुळे तोडण्यात येणार आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विद्याविहार पश्चिम येथील एक्सलेटर ३१ डिसेंबर २०१६ रोजी बांधण्यात आले असून यावर ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. सदर एक्सलेटर तोडण्यासाठी रेल्वेकडून २ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. अधिकांश वेळी बंद असलेल्या एक्सलेटरबाबत मध्य रेल्वेचे म्हणणे आहे की, मशीनच्या खालच्या भागात पाणी घुसल्याने एक्सलेटर काही भाग क्षतिग्रस्त झाला असल्यामुळे एक्सलेटर काम करत नव्हता. पूर्व भागात २ नवीन एक्सलेटर बसविले जाणार असून रेल्वे ओव्हर पुलासोबत एक्सलेटरचा कोणताही अवरोध नाही.
अनिल गलगली यांच्या मते सुरुवातीला गुणवत्ता राखली गेली नाही आणि प्रस्तावित ओव्हर पुलाचा विचार केला नाही. रेल्वे ओव्हर पुलाच्या बांधकामात अडथळा येत असल्याने एक्सलेटर तोडला जाणार असून याकामावर २ लाखांचा खर्च करण्यात प्रस्तावित आहे आणि एक्सलेटर बांधणीवर ३० लाख खर्च करण्यात आले आहे.
प्रस्तावित ओव्हर पुलाचे काम असतानाही एक्सलेटर बांधण्याची आवश्यकता काय होती? असा प्रश्न विचारत गलगली यांनी दावा केला आहेय यात त्यांनी म्हटले की, अधिकांश वेळी एक्सलेटर बंदच असायचा. यामुळे जनतेला काहीच सुविधा मिळाल्या नाही. उलट ३२ लाखांचा चुराडा झाला आहे. याबाबत चौकशी करत दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करत त्यांच्या वेतनातून झालेला ३२ लाखांचा खर्च वसूल करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?