आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारवर टीकास्त्र, म्हणाले “राक्षसी महत्वकांक्षा …”

Aditya thakarey
Aditya thakarey
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. 'राक्षसी महत्वाकांक्षा + पूर्णपणे कोलमडलेले प्रशासन = महाराष्ट्राचे नुकसान' असे गणित मांडत त्यांनी खोके सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला असल्याची टीका केली आहे.

एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, राज्यातील उद्योग आणि कृषी या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरील विश्वास उडाला आहे. उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा राज्यातील राजकीय स्थैर्यावरील तसेच हवामान संकटामुळे शेतकऱ्यांचा सरकारच्या पाठींब्यावरील विश्वास उडाला आहे. 'राक्षसी महत्वाकांक्षा + पूर्णपणे कोलमडलेले प्रशासन = महाराष्ट्राचे नुकसान' असे गणित मांडत ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news