देवेंद्र फडणवीस म्हणाले, आयपीएस अधिकारी मंत्र्याएवजी मला का भेटतात?
मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईतील साकीनाकामधील बलात्काराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे मन सुन्न झाले आहे. या घटनेमुळे असुरक्षिततेची भावना तयार होत आहे. या प्रकरणातील आरोपींवर फास्ट स्ट्रॅक कोर्टात खटला चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई पोलिस दलातील बदल्यांवरूनही फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे.
- केंद्राने नवीन प्रोत्साहन योजनेत विकेंद्रित वस्त्रोद्योग घटकांना वाऱ्यावर सोडले
- अमेरिकेने दहशतवादी समजून निर्दोष व्यक्तीला ठार मारले
मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करून तिला जखमी केल्याची घटना समोर आली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. या घटनेबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे मन सुन्न झाले आहे. अशा घटना घडत असताना पोलिस विभागात काय चालले आहे ते पहावे लागेल म्हणत त्यांनी पोलिस दलावर प्रश्नचीन्ह उपस्थित केले.
या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी. हे प्रकरण फास्ट स्ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी अशी. या प्रकरणात कोणतेही आश्वासन नको कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
- नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ‘योजना बंद, याचे श्रेय कुणाला द्यायचे?’
- राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…
अशा घटना घडत असल्याने एक प्रकारची असुरक्षिततेची भावना तयार होते. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही. यावर काही उपययोजना आहेत का ते पहावे लागेल म्हणत त्यांनी मुंबईतील पोलिस दलातील बदल्यांवर देखील गंभीर आरोप केला.