नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, 'योजना बंद, याचे श्रेय कुणाला द्यायचे?'
मुंबई; पुढारी ऑनलाईन : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याच्या मुद्यावरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केले आहेत. आरोग्य विमा योजना जेव्हा सुरु केली तेव्हा त्याचे श्रेय तुमच्या पक्षाने घेतले. पण जेव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
आपल्या हस्ते शुभारंभ झालेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली. त्यामुळे आता आपणास स्मरण करुन देण्याची वेळ आली आहे. जर ही योजना सुरु करण्याची मानसिकता नसेल तसेच या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याची घोषणा करुन टाकावी.
- राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…
- Tarapur Midc fire : तारापूर एमआयडीसीतील रंग रसायन कंपनीला आग
जेणेकरुन कर्मचारी स्वतः विमा काढतील. कर्मचाऱ्यांच्या भावनांशी सत्ताधाऱ्यांनी खेळू नये, असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.
‘आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वत:च्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात.
- नाशिक : जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या बदलीला जोरदार विरोध
- 9/11 Attack : ‘9/11’हल्ल्याची दोन दशके; अजूनही हा खटला सुरू
त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’ चीही जगभर वाहवा मिळवून घेतात.
पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात.
- Soyabean : सोयाबीन शेतीतून पैसा मिळवायचा आहे मग हे कराच…
- Rajsthan Viral Video Case : डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबलसोबतच्या व्हिडिओवर राजस्थान पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का?’, असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा :
- लवंगी मिरची : महागडा पेंग्विन आवडे त्यांना
- Land management : भू व्यवस्थापन करताना खत आणि पाण्याचे नियोजन असे करावे
- मुंबई-गोवा जलमार्गावर क्रूझ सेवा