सातारा : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येईल. त्याच्या हालचाली साेमवारीच्या विधान परिषद निवडणूकीच्या विजयानंतर सुरू झाल्या आहेत, असे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, शिवसेनेत आपल्याला किंमत दिली जात नाही, आपण डिस्टर्ब आहोत, असे सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांना फोनवर सांगितले. त्यानंतर त्यांनी आपला फोन बंद करून ते सुरतला रवाना झाले. यानंतर मध्यरात्रीपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आज ( दि. २१ ) दुपारी दाेन वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आता सर्वांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे वेधले आहे.
हेही वाचा