महाविकास आघाडी सरकारला धोका नाही : नाना पटोले | पुढारी

महाविकास आघाडी सरकारला धोका नाही : नाना पटोले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची नाराजी अल्पकाळाची आहे. आम्ही आत्मचिंतन करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटली. याबाबत काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. यात विचारविनिमय करू, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असेही पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी बंडखोरी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ते आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सुमारे पंधरा आमदार असल्याची माहिती आहे.

Back to top button