संदीप देशपांडेचं ‘पलायन’; राज ठाकरे झाले ट्रोल | पुढारी

संदीप देशपांडेचं ‘पलायन’; राज ठाकरे झाले ट्रोल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मनसे केलेल्या भोंग्याच्या आंदोलनानंतर राज्यभरात मनसेच कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. यावर आक्रमक होत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरी पत्र लिहीले आहे. राज ठाकरे यांनी मनसेच कार्यकर्त्यांची दहशतवादी असल्‍याप्रमाणे धरपकड सुरु असल्याचे पत्रात म्हटल्यानंतर सोशल मीडियामध्ये  राज ठाकरे चांगले ट्रोल होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांविरोधात कठोर कारवाईचा आदेश कोणी दिला, हे सर्वांना माहित आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहून नका, सत्ता येत जात असते सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेला नाही, असे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

राज ठाकरे

संदीप देशपांडे व इतरांना एखाद्या पाकिस्तानातून ओलेल्या अतेरिकी, दहशतवादी प्रमाणे पोलिस शोध घेत आहेत. त्यांना हैदराबादच्या निजामाचे ‘रझाकार’ असेल्यासारखे पोलिस करत आहे. या पोलिसी बळजबरीचा आदेश कोणी दिला हे सर्वांना माहित असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यंमत्र्यांना लिहिले हे पत्र सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे.या पत्रात संदीप देशपाडे यांचे समर्थन केल्‍याने राज ठाकरे चांगलेच ट्रोल हाेत आहेत. यामध्ये अनेकांनी संदीप देशपांडे तुमच्याच बेसमेंटमध्ये लपला असेल. यासह अनेक कमेंट द्वारे राज ठाकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

Back to top button