Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पाचे जनताही स्वागत करेल : अजित पवार
मुंबई : पुढारी ऑनलाईन
विकासासाठी दिशा दाखवणारा अर्थसंकल्प असे असे गोरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे. राज्यातील जनतेचा विकास करणारा हा अर्थसंकल्प असून राज्याची जनताही याचं स्वागत करेल, असे अजित पवार म्हणाले. ते विधानभवनहून प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.
गेली २ वर्ष सगळ्यांची अडचणीत गेली. राज्याच्या हिताचा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा हा अर्थसंकल्प असल्याचे अजित पवार म्हणाले.
दुसरीकडे विरोधक घोषणाबाजी करण्यास सज्ज आहेत. यावेळी विधानभवनबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
- Maharashtra Budget 2022 : हे वर्ष महिला शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवणार : अजित पवार
- महाराष्ट्र अर्थसंकल्प : शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज मिळणार, ९११ कोटींची तरतूद
- Maharashtra Budget : आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ११ हजार कोटी!
महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री @AjitPawarSpeaks हे राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.#Live#MahaBudget2022#महाबजेट2022#अर्थसंकल्पीयअधिवेशन https://t.co/q4wTTCfYOk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 11, 2022