माणिकराव जगताप यांच्या निधनाने कोकणातील चेहरा हरपला: अशोक चव्हाण | पुढारी

माणिकराव जगताप यांच्या निधनाने कोकणातील चेहरा हरपला: अशोक चव्हाण

मुंबई; पुढारी ऑनलाईन : माणिकराव जगताप यांच्या निधनाने कोकणातील काँग्रेसचा चेहरा हरपला, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. माणिकराव जगताप यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे, असेही ते म्‍हणाले.

अधिक वाचा – 

माणिकराव उत्तम संघटक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप हे  एक उत्तम संघटक होते. कुशल वक्ते होते. लोकांच्या प्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. कोकणच्या समस्यांची त्यांना चांगली जाण होती.

अधिक वाचा – 

माणिकराव जगताप यांच्‍या अकाली निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. ते माझे निकटचे सहकारी होते. त्यांच्या रूपात माझा एक बंधुतुल्य मित्र निघून गेला, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी जगताप यांच्या निधनावर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

हेही वाचलं का? 

 

Back to top button