बीड; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील नागझरी या गावासाठी अद्यापही रस्ता नाही. त्यामुळे आजच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी नागझरी येथील शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून नागझरी शहागड या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागला.
आज मराठवाडा स्वातंत्र्य होऊन 74 वर्षे पूर्ण झाली. मात्र तरीही नागझरी या गावासाठी शासकीय नियोजनातून रस्ता नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांचे पावसाळ्यात खूप हाल होतात. याची प्रशासनालाही माहिती आहे. गावाचा जुना रस्ता आहे, पण शेतकऱ्यांनी तो रस्ता बंद केल्यामुळे रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. या गावासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एक कोटी 9 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र संबंधित शेतकऱ्यांनी हे काम अडविले आहे. प्रशासनाने कायदेशीर बाबी पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गावाला रस्ता मोकळा करून द्यावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा :