एका आठवड्यात किमान 80 मीमी पाऊस झाला तर पेरणी करता येते. त्यापेक्षा कमी पाऊस असल्यास पेरणीचे धाडस करता कामा नये. यावर्षी अल निनोच्या सक्रीयतमुळे पाऊस कमी होईल असे बोलले जात असले तरी यापूर्वी अल निनो सक्रीय असतांना चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे आताच त्याबाबतीत ठामपणे अंदाज बांधणे शक्य नाही. अशा स्थितीत शेतकर्यांनी हवामान विभागाकडून येणार्या सूचनांचे पालन करुन नियोजन करायला हवे.– डॉ.वसंत सुर्यवंशी, कृषी विद्यावेत्ता, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ.साधारणतः आपल्याकडे कापुस आणि सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. याबरोबरच तूर, मका, बाजरी, मुग, उडीदाचीही पेरणी होते. पाऊस लांबल्यास पिकांचे नियोजन करता येऊ शकते. परंतु सुरुवातीला पाऊस पडून खंड पडल्यास शेतकर्यांना आर्थिक फ टका बसू शकतो. पावसाच्या आगमनाच्या कालावधीनुसार शेतकर्यांनी पिकांची निवड करणे गरजेचे आहे.– सुर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी, अंबाजोगाई