

Payments for the district's Shivbhojan Thali scheme are overdue
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शासनाने राज्यातील गरीब व गरजूंना केवळ १० रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी सुरू केली. जिल्ह्यात ११२ केंद्र आहेत. त्यासाठी सुमारे २ कोटींचा निधी लागतो. मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, कोरोना काळातही अनेकांना शिवभोजनमुळे पोटभर जेवण मिळाले. मात्र मागील सहा महिन्यांपासून या योजनेचा निधी रखडला आहे.
जिल्ह्यात एकूण ११२ शिवभोजन केंद्र आहेत. एका केंद्रात दररोज ७५ ते १५० ग्राहक जेवण करतात. एका थाळीचे दर १० रुपये आहे, तर राज्य शासन केंद्रचालकाला एका थाळीचे ४० रुपये अनुदान स्वरूपात अदा करते.
जिल्ह्यातील ११२ केंद्रांवर सुमारे ७,८०० थाळी देण्यात येतात. महिन्याला सुमारे २ लाख ३५ हजारांहून अधिक शिवभोजन थाळी वितरित होते. त्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला २ कोटींचे अनुदान प्राप्त होते. फेब्रुवारीपासून म्हणजेच मागील पाच महिन्यांपासून जिल्ह्याला अनुदानाचा एक पैसाही शिवभोजन केंद्रचालकाला मिळालेला नाही.