याबाबतची अधिकची माहिती अशी की, साहेब पठाण हे त्यांच्या पत्नी आणि मुलांवर चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत होते. शिवाय ते मुलांना रोज दारु पिऊन मारहाण देखील करत असत. त्यांचा मुलगा साहिल याने १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेवणासाठी फोनकरुन बोलावले. त्यावेळी साहेब पठाण यांनी मी शेतात जेवणार असल्याचे सांगितले. साहिल याने डब्बा तयार करून छोटा भाऊ तोहित याच्याजवळ पाठविला. मात्र, साहेब पठाण यांना मलाने जेवण नेले तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते.