दोन तुळशीराम आणि एक तुळशीदास हे मराठवाड्यातून निवडून गेलेले. नामसाधर्म्याचा भाग सोडला तरी या लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा पक्ष व सरकार पातळीवर आपला ठसा उमटविला होता. लातूर हा राखीव मतदारसंघ होता. तेथे काँग्रेसने उदगीरचे तुळशीराम कांबळे यांना उमेदवारी दिली होती, लगत असलेल्या धाराशिवमधून तुळशीराम पाटील यांनी बाजी मारली. जालन्यात रामराव नारायणराव लोणीकर (यादव) यांचा विजय झाला. पुढे लोणीकर हे परभणीतून दोन वेळा लोकसभेवर, एकदा विधिमंडळात निवडून गेले. विविध महामंडळावर त्यांनी काम केले. लोणीकर हे आपल्या आडनावात यादव असे लावत असत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त असली तरी यादव नाव पुढे आल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठी लोणीकरांना उमेदवारी देत. (उ. प्र. मधील नेते केंद्रीय कार्यकारिणीवर होते. यादव हे नाव उत्तरेत लोकप्रिय आहे.) व्दारकादास मंत्री हे सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. परभणीतून निवडून आलेले शिवाजीराव हे कळमनुरीचे. कळमनुरी सारख्या मागास भागात त्यांनी डोंगरकडा साखर कारखान्याची स्थापना केली.
हेही वाचा