आमचं सरकार गतिमान, पण ठाकरेंनी….,देवेंद्र फडणवीसांचा टोला | पुढारी

आमचं सरकार गतिमान, पण ठाकरेंनी....,देवेंद्र फडणवीसांचा टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : “छत्रपती संभाजीनगर हे शरद पवारांना मान्य नाही. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान विसरु शकत नाही.  पवारसाहेब म्हणतात मी औरंगाबादच म्हणणार” असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान उपस्थितांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्याहस्ते जल जीवन मिशन अंतर्गत गंगापूर-वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.

उपमुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.  म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर हे शरद पवारांना मान्य नाही. आम्ही छत्रपती  संभाजी महारांजांचं बलिदान विसरु शकत नाही.  पवारसाहेब म्हणतात मी औरंगाबादच म्हणणार”.

पुढे बोलत असताना फडणवीस म्हणाले, की आमचं सरकार गतिमान आहे, ठाकरे सरकारनं योजनांना प्रशासकीय मान्यता दिली नाही. आमच्या सरकारने  या वर्षात ३५ योजनांना मान्यता दिली आहे. गंगापूरला १ हजार कोटींची पाणीपुरवठा योजना केली. गंगापूर -वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा सिंचन योजनेमुळे ३७३ गावांना नळाने पाणीपुरवठा होणार, असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button