बीड: विजेचा धक्का लागून चुलते-पुतणे जागीच ठार | पुढारी

बीड: विजेचा धक्का लागून चुलते-पुतणे जागीच ठार

गेवराई; पुढारी वृत्तसेवा: विजेचा धक्का लागून चुलते-पुतणे यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २७) दुपारी तीन वाजता मन्यारवाडी (ता. गेवराई, जि.बीड) येथे घडली. फिरोज शेख (वय ४५, रा. संजयनगर,गेवराई ) आणि समीर शेख (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई शहरातील संजयनगर येथील रहिवाशी शेख फिरोज आणि शेख समीर हे दोघे चुलते-पुतणे गवंडी काम करतात. आज दुपारी मन्यारवाडी येथील एका बिल्डिंगचे प्लास्टर करण्यासाठी गेले होते. काम करताना पुतण्या समीर याला विजेचा धक्का लागला. त्याला वाचविण्यासाठी गेलेले चुलते शेख फिरोज यांनाही धक्का लागला. यात दोघांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. गेवराई परिसरातील नागरिकांनी रूग्णालयात गर्दी केली होती.

हेही वाचा 

Back to top button