कोरोना काळामुळे वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविण्यात आली असून, खुल्या जागेसाठी ३० व अन्य जागांसाठी ३३ वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपला अर्ज दाखल होतो की नाही याची धास्ती उमेदवारात आहे. अनेक ठिकाणाहून प्रयत्न केले, मात्र अर्ज दाखल होत नसल्याने चिंता वाढत आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पोर्टल सुरू करावे आणि हे पोर्टल बंद का झाले? याची चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तरुणांमधून होत आहे.