सत्ता असो वा नसो आपला विकासनिधी कोणीच रोखू शकत नाही : धनंजय मुंडे | पुढारी

सत्ता असो वा नसो आपला विकासनिधी कोणीच रोखू शकत नाही : धनंजय मुंडे

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्तांतर झाले असले तरी आपल्या मतदार संघावर सत्ता असण्याचा किंवा नसण्याचा काही परिणाम होत नाही. आपल्याकडे सत्ता असो वा नसो आपला विकास निधी कोणीच रोखू शकत नाही असे प्रतिपादन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत बोलताना केले.त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना त्यांनी सत्तांतरानंतर भाष्य केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, 2019 च्या निवडणुकीत मला जनतेने अभूतपूर्व प्रेम देऊन निवडून दिले, त्यांच्याच आशीर्वादाने मी मंत्री झालो. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर राज्यात सत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही. माझ्या पाठीशी असलेले सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती असून मी सदैव जनसेवेत राहण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

परळी शहरातील हालगे गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनंजय मुंडे प्रेमी कार्यकर्ते, समर्थक, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आदींनी धनंजय मुंडे यांना भेटून शुभेच्छा दिल्या. कोणत्याही अपेक्षेविना राज्यभरातून शेकडो किलोमीटर प्रवास करून आलेल्या असंख्य समर्थकांच्या गर्दीत धनंजय मुंडे यांनी जनतेचं प्रेम हीच आपली शक्ती असल्याचे म्हणत, शुभेच्छा व आशीर्वाद देणाऱ्या सर्वांच्या ऋणात राहून जनसेवेचे व्रत कायम जोपासणार असल्याचे आवर्जून नमूद केले.

हेही वाचा

Back to top button