'मुश्रीफांना सत्तेच्या राजकारणासाठी रक्तपात घडवायचा आहे का?'
इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : सुळकूड पाणी योजनेवरून मंत्री हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना सत्तेच्या राजकारणासाठी रक्तपात घडवायचा आहे का, जनभावनांचा उद्रेक करून दंगली घडवायच्या आहेत का, असा सवाल ‘मी इचलकरंजीकर’ या बॅनरखाली एकवटलेल्या इचलकरंजीकरांच्यावतीने करण्यात आला.
त्यांच्या वक्तव्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. मंत्री मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी मंगळवार, दि. 29 रोजी पोलिस प्रशासनाकडे मागणी करण्याचा आणि 31 ऑगस्ट रोजी संयुक्त मेळावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
हेही वाचा :