कोल्हापूर : दहावीची परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा गाेंधळ, वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर : दहावीची परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा गाेंधळ, वाहतूक विस्कळीत
Published on
Updated on

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : दहावीचा भूगोलचा शेवटचा पेपर शनिवारी संपला. परिक्षा संपताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली. कोल्‍हापूर येथील पद्माराजे, एस एम लोहिया, न्यू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच आनंद साजरा करत रंगपंचमी साजरी केली.

दरम्‍यान, विद्यार्थ्यांच्या या प्रकारामुळे तब्‍बल अर्धा तासाहून अधिक वेळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी पोहचले आणि मुलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवला. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून होत असलेल्‍या गोंधळाबाबत शाळा प्रशासन काहीच दखल घेत नाही असे असे स्‍थानिक नागरीकांनी माहिती दिली. तसेच या अशा होणा-या घटनांना प्रशासनाने थांबवावे अशी मागणी केली आहे.

.हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news