कोल्‍हापूर: वन्यजीव आणि वीज पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा; राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शाहूवाडीत मोर्चा | पुढारी

कोल्‍हापूर: वन्यजीव आणि वीज पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा; राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शाहूवाडीत मोर्चा

कोल्‍हापूर, पुढारी वृत्‍तसेवा : मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरूवात शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन झाली.

या मोर्चामध्ये वन्यजीव आणि वीज पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मुख्य मागण्या आहेत. तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 40 लाख नुकसान भरपाई द्या, भूमीपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा विविध मागण्या करण्यात आले आहेत.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, शेकापचे जिल्हा सरचिटणीस भाई भारत पाटील, राजेंद्र गड्ड्यानावर, संदीप राजोबा, राजेंद्र देशमाने, राजाराम मगदूम, सुरेश म्हाऊटकर, पद्मसिंह पाटील, वसंत पाटील तसेच शेकापचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा 

राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातले मीर जाफर : भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा टोला

धर्मांतर केलेल्‍या ए राजा यांची आमदारकी केर‍ळ उच्‍च न्‍यायालयाने केली रद्द, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण

 

Back to top button