काेल्हापूर : तुळशी धरण ८३% भरले
धामोड; पुढारी वृत्तसेवा : पंधरा दिवसांच्या विश्रांती नंतर धामोड (ता. राधानगरी) परिसरात शनिवार पासुन मुसळधार पावसाला सुरवात झाली असुन ओढे – नाले तुडूंब वाहत आहेत. त्यामुळे तुळशी धरण ८३ टक्के भरले आहे.
गेले पंधरा दिवस पावसाने दडी मारल्यामुळे माळरानावरील भातरोप व नाचणीची लागण थांबली होती; पण शनिवारपासून धामोड परिसरात पावसाने मुसळधार सुरवात केली आहे.
तुळशी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १३० मिमी पावसाची नोंद झाली असून आज अखेर या परिसरात २२४० मिमी पाऊस झाला आहे. या परिसरात मुसळधार पाऊसाने दमदार सुरवात केली आहे. यामुळे ९१० क्युसेक पाणी तुळशी धरणात येत असून धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे . पावसाच्या हजेरीमुळे रखडलेल्या कामात बळीराजा व्यस्त झाला आहे .