रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे दापोलीत मालवाहू वाहन पलटले | पुढारी

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे दापोलीत मालवाहू वाहन पलटले

दापोली; पुढारी वृतसेवा : दापोली तालुक्यातील जालगाव येथे मालवाहू गाडी पलटली. या अपघातात तीनजण किरकोळ जखमी झाले तर एकजण गंभीर जखमी आहे. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी मुसळधार पावसात ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दापोलीकडून दाभोळकडे मालवाहू वाहन जात होते. या अपघातातील सर्व जखमींना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. जखमींमधील एक माटवण गावातील असून बाकी तिघेजण वडवली गावातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच अनेक लोकांनी या वेळी मदत केली. या अपघाताचा तपास दापोली पोलीस करत आहेत. दोन दिवसापूर्वी दापोलीत भीषण अपघात झाला होता.

हेही वाचा;

Back to top button