जालना : समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरण; दोघांना अटक

मूर्ती चोरी प्रकरण
मूर्ती चोरी प्रकरण
Published on
Updated on

जालना ; पुढारी वृत्‍तसेवा : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना कर्नाटकातून अटक केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून समर्थांच्या हनुमानाच्या मूर्ती जप्त केल्या आहेत. या मंदिरातून दीड महिन्यांपूर्वी 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या होत्या. समर्थ रामदास स्वामी यांनी १५३५ मध्ये या मूर्तींची स्थापना जांबसमर्थ येथे केली होती. 11 ऑगस्ट रोजी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाचा तपास लागावा म्हणून मोठे जनआंदोलन जालना जिल्ह्यात उभे झाले होते. तसेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा विषय गाजला होता. काही दिवसांपूर्वीच जांब येथील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती.

या चोरी प्रकरणातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र यातील मुख्य आरोपी अजुनही फरार असल्‍याचे वृत्‍त आहे. पोलिसांकडून त्‍याचा शोध सुरू आहे. ग्रामस्‍थांचा वाढता रोष, आंदोलने यामुळे पोलिसांवर या चोरी प्रकरणाचा छडा लावून मूर्ती शोधण्याचे आव्हान उभे झाले होते. मात्र पोलिसांना आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यात अखेर दीड महिन्यानंतर यश आले.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news