वाळकी : पोलिसांवर दगडफेक आणि अश्रूधुराचा वापर

वाळकी : पोलिसांवर दगडफेक आणि अश्रूधुराचा वापर

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दुपारची वेळ, गावातील मुख्य चौकात उपस्थित असलेले गावकरी आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक चोहोबाजूंंनी, गल्लीबोळातून मोठमोठ्याने घोषणा देत जमाव पळत आला. त्यांनी आक्रमक होत घोषणा सुरू केल्या. तेवढ्यात सायरन वाजवत पोलिसांचा मोठा फौजफाटाही दाखल झाला. जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. मग पोलिसांनी दंगल नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर लाठीमार केला. अश्रूधुराचा वापर करीत जमाव पांगवून दंगल नियंत्रणात आणली.

नगर तालुक्यातील अरणगाव येेथे गुरुवारी (दि.14) दुपारी घडलेल्या या घटनेने गावकरी चांगलेच भयभीत झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिसांचे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक असल्याचे समजल्यावर गावकर्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका, भिंगार कॅम्प, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावागावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने संवेदनशील असलेल्या अरणगाव, वाळकी व वडगाव गुप्ता या गावांत गुरुवारी (दि.14) दुपारी नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, नगर तालुक्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्यासह पोलिसांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले.

गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेची काळजी सर्वांनी घ्यावी. कायद्याचे पालन करावे. उत्सवादरम्यान सामाजिक शांतता भंग करणार्‍यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल.

– संपतराव भोसले, पोलिस उपअधीक्षक, नगर ग्रामीण

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news