दोन्ही नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढण्याचे सूतोवाच वेळोवेळी केले आहेत. दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात पडले आहेत. तालुक्यात दोन्ही पक्षांचे वर्चस्व मिळवायचे असेल, तर आगामी निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत, असा एक मतप्रवाह निर्माण झाला आहे. या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस हे स्वतः आग्रही आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये ते नेहमीच समन्वयकाची भूमिका पार पाडत असतात. आता ते स्वतःच दोन्ही काँगेसने एकत्र लढावे, यासाठी पुढाकार घेणार असल्याने दोन्ही नेते काय भूमिका घेतात, यावर पुढील आघाडी अवलंबून असणार आहे.