अहमदनगर जिल्ह्यामध्ये ई -प्रणालीद्वारे होणार पंचनामे : आयुक्त गमे | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यामध्ये ई -प्रणालीद्वारे होणार पंचनामे : आयुक्त गमे

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  अतिवृष्टीने शेतकर्‍याच्या शेतपिकांचे नुकसान झाल्यानंतर महसूलचे अधिकारी व कर्मचारी येण्याची शेतकर्‍यांना वाट पहावी लागत होती, मात्र येथून पुढे ही अडचण दूर होऊन नाशिक विभागाच्यावतीने धुळे जिल्ह्यात ई- पीक पंचनामा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तशीच अहमदनगर जिल्ह्यातही ई -पंचनामा प्रणा लीद्वारे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील अशी घोषणा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये संगमनेर उपविभागाच्या वतीने महसूल सप्ताह निमित्ताने लाभार्थ्यांना लक्ष्मी योजनेअंतर्गत सातबारा उतारे व दिव्यांग बांधवांना दारिद्र्य रेषेचे रेशनकार्ड विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, संगमनेर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, प्रवेशाधीन उपजिल्हाधिकारी नूतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

गमे म्हणाले, आता राज्यशासनाच्या महसूल विभागाच्या सातबारा उतारा, ई -फेरफार , ई- पीक पाहणी आणि पोट हिस्सा, ई- मोजणी या सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही. इथून मागे जर अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या शेतमालाचे नुकसान झाले तर तलाठी आणि कृषी अधिकारी शेतकर्‍याच्या शेतात जाऊन पंचनामा करत असायचे, मात्र तलाठी अगर कृषी सहाय्यक वेळेवर येत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे पंच नामे लवकर होत नव्हते. मात्र आता कुठल्याही आपत्तीने नुकसान झाले तर त्याचे पंचनामे करण्यासाठी कोणाचीही वाट पहावी लागणार नाही, तर शेतकरी स्वतःच ऑनलाईन स्वरूपात पंचनामे करणार आहे.

त्यामुळे शासनाकडून मदत मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. पूर्वीच्या काळी जमिनीची मोजणी करण्यासाठी वेळ लागत होता, मात्र आता संपूर्ण जिल्ह्यात उपग्रहांच्या मार्फत मोजणी सुरू केली आहे. त्यामुळे बांध कोराकोरी करण्यास निश्चितच आळा बसेल.  संगमनेर उपविभागाचे उपविभागिय अधिकारी शैलेश हिंगे यांनी महसूल सप्ताहाच्या निमित्त राबविलेले व राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली प्रा. तुळशीराम जाधव यांनी लक्ष्मी मुक्ती अभियानाचे गीत गायले सावरगाव तळ येथील राहिवासी आणि सध्या ऑस्ट्रॉली यात स्थियिक झालेले लक्ष्मीमुक्ती योज नेत सहभागी झालेले काशिनाथ थिटमे आणि अमेरिकेतून प्रल्हाद नेहे यांनी ऑन लाइन अर्ज करून सहभाग घेतला वकील तर यावेळी ऍड समीर लामखडे दिव्यांग सारथी संस्थेचे पांडुरंग कासार यांनी मनोगत व्यक्त केले.

महसूल सप्ताह उपक्रमातून अधिकारी व कर्मचार्‍यांना जनतेपर्यंत पोहचण्याची संधी मिळाली. यात तीन साडेतीन हजार मदतीचे प्रकरणे मंजूर करून मदतीचा हात दिला आहे. लक्ष्मी मुक्ती योजनेतून वडिलांबरोबर आईचे नाव सातबारावर पत्र लिहीण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. खाजगी सेतुला पायबंद घालण्यासाठी आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन मुलांना सेतूपासून कसे दूर होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरु राहणार आहे. महसूल विभागाचे काम जनतेपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न आहे. महसूलशी असलेल्या नागरिकांची समस्या कायद्याच्या चौकटीत बसवून सोडवू. यासाठी जनतेने सहकार्य करावे.
                                    — सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी अहमदनगर 

 

हेही वाचा :

MonsoonSession : लोकसभेचे कामकाज पुन्हा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

राज्यातील 43 धरणांत निम्म्यापेक्षा कमी पाणी

Back to top button