नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : राज कुंद्राच्या पाॅर्नोग्राफी रॅकेट प्रकरणामुळे बाॅलिवुडमधील महिला अत्याचाराच्या बातम्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. खरंतर ही चांगली गोष्ट आहे की, आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल अनेक अभिनेत्री बोलत्या झाल्या आहेत. यामध्ये नॅशनल पुरस्कार विजेत्या डाॅक्युमेंटरी फिल्ममेकर आणि लेखक त्रिशा दास यांचाही समावेश झाला आहे.
विशेष करून ज्या अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अत्याचारावर बोलण्यास कचरत होत्या. त्या खुलेपणाने आणि स्पष्टपणे बोलत आहेत. त्यातून फिल्म इंडस्ट्रीतील काळे कारनामे पुढे येत आहेत. त्रिशा दास यांनी नुकतेच आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणावर भाष्य केलं आहे. हा खुलासा बाॅलिवुडमध्ये आश्चर्य मानलं जात आहे. त्रिशा दास म्हणाल्या की, "मी कित्येक वेळी यौन शोषणाला बळी पडलेली आहे. तेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया जमाना नव्हता."
"आणि मीटू चळवळदेखील नव्हती. एक फेमिनिस्ट असल्यामुळे २०१६ मध्ये जेव्हा मी माझं पहिलं पुस्तक 'Ms Draupadi Kuru: After the Pandavas' लिहिलं. तेव्हापासून आतापर्यंत खूप बदल झालेला आहे. आता लोक लैंगिक समानतेवर खुलेपणाने बोलताहेत. कामाची ठिकाणी जिथं लैगिंक विषमता होती, तिथं मीटू चळवळ सुरू झाली आहे", असंही त्यांनी सांगितलं.
त्या पुढे म्हणाल्या की, "जुन्या दिवसांचा विचार केला तर, जेव्हा मी डाॅक्युमेंटरी फिल्ममेकर म्हणून काम करत होते, तेव्हा माझं कित्येकवेळा यौन शोषण झालेले होतं. पण, त्यावेळी ती सामान्य गोष्ट होती. तेव्हा कोणता सोशल मीडिया नव्हता, जिथं आपल्यावर झालेला अत्याचार सांगता येत नव्हता."
"शांत बसून आपल्यावर होणार अत्याचार सहन करत बसणे, ही सामान्य गोष्ट होती. पुरुषांमध्ये कोणती भीती नसते. पण, सोशल मीडियावर यौन शोषणावर होणारी चर्चा आणि मीटू चळवळीनंतर परिस्थिती बदलली. कारण, या चळवळी महिलांच्या सशक्तीकरणासाठी झाल्या. मला आशा आहे की, यावर राजकारण होणार नाही", असा लैगिंक अत्याचाराचा भूतकाळ त्यांनी सांगितला.
पहा व्हिडीओ : डिंपल को सिम्पल नही समझनेका!
हे वाचलंत का?