Air India टाटा ग्रुपने घेतल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. याला सरकारने व टाटा ग्रुपने दुजोरा दिला नव्हता, पण आज Air India टाटा ग्रुपने घेतल्याचे जाहीर केले. यानंतर टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली.
Welcome back, Air India अस ट्विट टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटला काही सेकंदाच अनेकांनी रिट्विट केल आहे. यावर कमेंटही केल्या.
कर्जात बुडालेली एअर इंडिया अखेर टाटा सन्सकडे आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची लिलाव प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या बोलीत स्पाइस जेटच्या अजय सिंह यांनी बोली लावली मात्र,त्यापेक्षा टाटा सन्सने 18 हजार कोटींची बोली लावत लावत हा लिलाव जिंकला.
सरकारने एअर इंडियाच्या विक्रीसाठी जी किंमत निश्चित केली आहे, त्यापेक्षा ३ हजार कोटी रुपयांची जास्त बोली टाटा सन्सने लावली होती. स्पाईसजेटचे मालक अजय सिंग यांनी लावलेल्या बोलीपेक्षा टाटा सन्सची बोली पाच हजार कोटी रुपयांनी जास्त होती. शुक्रवारी मात्र, एअर इंडिया टाटा सन्सकडे आल्याचे सरकारने जाहीर केले.
हे ही वाचलं का ?