पिंपरी: पुढारी वृत्तसेवा
मागील आठवड्यापासून पालेभाज्यांचे दर वाढतच आहेत. उन्हाच्या वाढत्या तडाख्याचा परिणाम भाजी मंडईवर झाला आहे. आवक कमी प्रमाणात झाल्याने पालेभाज्या महाग झाल्या असून फळभाज्यांच्या दरात रुपया दोन रुपयांनी घसरण झाली आहे. मटकी, मूग, मसूर या कडधान्यांच्या खरेदीवर ग्राहकांचा भर आहे. पिंपरी येथील भाजी मंडई आणि मोशी उपबाजार समितीमध्ये कांदा, बटाटा आवक जास्त झाली आहे. गेले आठवडाभर पिंपरी चिंचवड परिसरात तापमान कमी जास्त होत आहे. फळांना मागणी वाढली असून फळांचे भावही स्थिर आहेत. कलिंगड, टरबूज यांची आवक जास्त झाली आहे. लिंबाचे दर कमी झाले असून मागणी वाढली आहे.
कलिंगड, टरबूज या रसाळ फळांना ग्राहकांकडून वाढती मागणी आहे. मात्र, आवक वाढलेली असल्याने फळांचे भाव स्थिर आहेत. कांद्याची आवक 744 क्विंटल तर बटाट्याची आवक 575 क्विंटल झाली आहे. लिंबूची मात्र 26 क्विंटल आवक झाली आहे. बाजारात अद्यापही कैर्यांना मागणी आहे. लोणच्याच्या कैर्या बाजारात आल्या आहेत. मोठ्या कैर्यांचे भाव वाढले असून किलोमागे 70 ते 80 रुपये भाव मिळत आहे. टमाट्याची आवक 195 क्विंटल झाली आहे. काकडीची आवक वाढली असून 99 क्विंटल झाली आहे. काकडीने सुद्धा भाव खाल्ला आहे. 80 रुपये किलो काकडीला भाव आहे.
पालेभाज्या दर : पालक 25, कोथिंबीर 25, मेथी 22, शेपू 20, कांदापात 20, पुदिना 15, मुळा 15.
फळांचे नाव दर (किलो) : कलिंगड 30-32, खरबूज 35 – 40.
फळभाज्यांचे किलोचे भाव : कांदा 25-30, बटाटा 25-30, लसूण 40 – 45, भेंडी 40 – 45, गवार 60-70, टोमॅटो 80-100, दोडका 35-40, हिरवी मिरची 80, कोल्हापुरी मिरची 100, दुधी भोपळा 20-30,लाल भोपळा 35, पांढरी काकडी 70-80, कारली 40 -50, पडवळ 60, फ्लॉवर 40, कोबी 35, वांगी 30 – 40, भरताची वांगी 30-40, शेवगा 40-50, गाजर 25 – 30.