पुढारी ऑनलाईन डेस्क : शेवटी मनुष्य प्राणी म्हटल्यावर चुका होणार, चीडचीड होणार, राग हा येणारच. मग ती व्यक्ती लहान असो, मोठी असो अगर वयोवृद्ध. मनाविरोधी कोणतीही कृती झाल्यास, दुसऱ्या व्यक्तीने त्रास दिल्यास राग (Tips For Parent) हा येतोच. राग, क्रोध, प्रेम हे जीवनाचा भागच आहेत ते ठराविक काळापुरतेच राहते आणि पुन्हा कमी जास्त होते.
रागाचा प्रभाव जरी दिर्घकाळ राहत नसला तरी, रागाच्या (Tips For Parent) भरात हातून भयंकर चुका होऊ शकतात आणि याच्या परिणामांचे पडसाद आयुष्यभर उमटत राहतात. म्हणून आपण मुलांवर सतत रागावल्याने काय परिणाम होतात; हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. जे तुम्हाला तुमच्या मुलांच्या जडणघडणीत मदत करू शकतात.
काही पालक हे त्यांच्या मनात सुरू असलेला विचार, ऑफिसमधील सहकार्यांशी झालेले मतभेद आणि कामाचा ताण कॅरी करतात. घरी आल्यावर मुले जर मनाविरूद्ध वागली किंवा त्यांचे ऐकले नाही, तर पालक मुलांवर आपल्या राग काढतात. पण पालकांना हे कळत नाही की, याचा मुलांवर दीर्घकालीन हानिकारक परिणाम होऊ शकतात. पालकांकडून नेहमी रागराग (Tips For Parent) व्यक्त केल्यास, कुटुंबात तणावाचे वातावरण राहते. याचा परिणाम मुलांची कार्यक्षमता, त्यांच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.