मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार सुरु आहे. हिंसाचारामुळे असंख्य लोक बेघर झाले असून त्यांना पुनर्वसन केंद्रात आसरा घ्यावा लागलेला आहे. दुसरीकडे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांबरोबरच लष्कराला तैनात करण्यात आलेले आहे. राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणण्याबरोबर लोकांना दिलासा देण्यासाठी कोणकोणते उपाय केले जात आहेत, याची सविस्तर माहिती सादर करा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. (SC sought report on Manipur)