पुढारी ऑनलाईन : सत्तेतील सहकारी पक्षाला इंप्रेस करून मंत्रीपद मिळवण्यासाठी गद्दारांची माझ्याविरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचे मत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सुरू असलेल्या शिंदे गटाच्या बॅनेरबाजीवर आदित्य ठाकरे विधानभवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी आमचा आवाज दाबण्याचा, आम्हाला कितीही संपविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहू. या गद्दारांचा मुखवटा फाडणारच, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. या ४० गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठित खंबीर खुपसला. आम्ही त्यांना काय कमी केलं की, त्यांनी अशी गद्दारी केली. ४० जणांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरे जावं असेही ते म्हणाले.
गद्दारांनी केलेल्या आंदोलनबद्दल मला वाईट वाटत आहे. त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन करावे, असेही मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.